ठाणेकरांनो



ठाणे म्हणजे दहीहंडी सणासाठी ओळखलं जाणार शहर. स्वर्गीय आनंद दिघे साहेबांच्या प्रेरणेने ह्या सणाचं महत्व द्विगुणित झालं. ह्याच सणाच्या निम्मिताने एक-दोन महिने सराव करून मराठी तरुण एकत्र येतात. मराठी माणसाला एकत्र आणणारा हा मराठमोळा सण.. मराठी तरुणांना ह्या सणाची एक वेगळीच आतुरता लागलेली असते..

मराठमोळ्या ह्याच सणावर काही वर्षांपूर्वी निर्बंध आणण्यात आले. सगळीकडे हा सण इतिहासजमा होण्याचं वातावरण झालं. सत्तेत असणारे अकार्यक्षम झाले होते. न्यायालयाने ह्या सणावर जाचक अटी लादल्या. मराठी तरुण हतबल झाला. मराठी सणाची आणि मराठी तरुणाची हि हतबलता एका महाराष्ट्र सैनिकाने हेरली तो म्हणजे "अविनाश जाधव" ..

न्यायालयाचा आदेश असताना, मनात न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान करण्याची कुठलीही इच्छा नसताना, हा माणूस दहीहंडी मराठी सण साजरा करण्यासाठी मैदानात उतरला. "जय जवान" सारख्या जगप्रसिद्ध गोविंदा पथकाने अविनाश जाधवांच्या तळमळीला होकार दिला आणि मनसेच्या माध्यमातून सर्वात मोठी दहीहंडी मोठ्या आनंदाने साजरी केली. ह्या दहीहंडीसाठी स्वतःच्या अंगावर अविनाश जाधवांनी केसही घेतली. पण, ह्या माणसाने मराठी सणासाठी घेतलेला वसा मोठ्या उत्साहाने पुढे नेला..

अविनाश जाधवांना त्यांचं मत विचारलं तर ते म्हणता "माझा मराठी तरुण पब मध्ये जाऊन लाखो पैसे खर्च करून आनंद नाही घेऊ शकत. माझ्या लाखो मराठी तरुणाच्या एकतेसाठी आणि आनंदासाठी दहीहंडीची संस्कृती मी विकोपाला जाऊ देणार नाही. माझ्या मराठी माणसाच्या आनंदासाठी माझं जीवन समर्पित आहे. दहीहंडी सणासह सर्व मराठी सण अजून उत्साहाने साजरे होतील आणि मी त्यात अग्रभागी असेल..".

*ठाणेकरांनो, मग विचार काय करता..? आता, आपलं मत मराठी सणासाठी, मराठी संस्कृतीसाठी..आपलं मतं अविनाश जाधवांना..*

डॉ. प्रशांत शिरोडे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गर्व से कहो..

प्रभु श्रीराम काल अनेक वर्षाच्या वनवासानंतर जन्मस्थळावर मोठ्या सम्मानाने विराजमान झाले.. हया दिवसाच खर श्रेय जात ते हिंदूहृदयसम्राट बाळासाहे...