..आणि महाराज.



४०० वर्षानंतरही मनात तीच आत्मीयता, तोच स्वाभिमान, तीच राष्ट्रनिष्ठा, तेच स्वराज्य प्रेम.. हे वैभव इतिहासात लाभलं ते फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना.. महाराजांचं व्यक्तिमत्व त्या काळात किती कर्तृत्वान, प्रभावी आणि दैदिप्यमान असेल जे आजच्या काळात सुद्धा भावून जात.

आज महाराजांवर लिहावंसं वाटलं कारण पण तसंच. काल महाराजांची वेशभूषा करण्याचं भाग्य अजून एकदा नशिबात आलं. महाराजांची वेशभूषा करणं म्हणजे एक जबाबदारी, एक आत्मसन्मान, एक वेगळंच कुतुहूल. स्वराज्यप्रेम आणि स्वराज्यनिष्ठा त्या काळात अनुभवायला भेटली असेल किंवा नसेल पण त्या गोष्टींचा अनुभव ह्या भूमिकेतून अनुभवायला भेटलं. महाराजांचा वेश चढवताना सुद्धा तो पाय पडून चढवला जातो. प्रत्येक गोष्टीत वेशभूषाकार आपलं कलेचं सर्वस्व लावून देतो. मावळ्यांच्या भूमिकेत असणारे आपल्या राजाच्या श्रद्धेपायी स्वतःला त्या भूमिकेतून दाद देताना दिसतात. आणि राहील रसिक मायबापाच, ते तर आपली मराठमोळी अस्मिता आणि त्यात महाराज म्हणजे डोक्यावरच घेतात. तो रसिकांच्या चेहऱ्यावरचा भाव जणू राजदरबाराचा निष्टेचा सहवास दिसत होता. आणि नेहमीप्रमाणे महाराजांच्या भूमिकेला प्रत्क्षात उतरवणं म्हणजे जणू सौभाग्यापेक्षा काही कमी नाही. हे सौभाग्य लाभलं आणि रंगमंचाकडे जाताना स्वतः महाराजच वेशभूषेत सामावून गेलेत आणि पुढे काय झालं ती श्रींची इच्छा होती.

महाराज साकारताना जबाबदारी निभावून नेल्यानंतर जो आनंद असतो तो शब्दात व्यक्त करता येत नाही. त्या वेशभूषेची किमया काही निराळीच आहे. महाराजांवरची गाणी, सर्वांची वेशभूषा आणि रसिकांचा प्रतिसाद मराठी अस्मितेच्या मानबिंदूला जणू प्रत्यक्षात साकारत होती. सगळं सगळं अभूतपूर्व होत...

महाराजांची वेशभूषा नेहमी करायला भेटो, महाराजांच्या संस्कारांचा वारसा नेहमी प्रज्वलित राहो हीच मनोभावे इच्छा. हिंदुस्थानातील जनतेला खरं आणि पहिलं प्रजासत्ताक देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना प्रजासत्ताक दिनी मानाचा मुजरा..

डॉ. प्रशांत शिरोडे.

स्वराज्यरक्षक संभाजी..


महाराष्ट्रासह जगाला शिवाजी महाराज जितके माहित झाले तितके संभाजी महाराज माहित नसल्याचं दुःख मनात कुठंतरी खटकत. अलीकडेच झी वाहिनीवरील डॉ. अमोल कोल्हे दिग्दर्शित "स्वराज्यरक्षक संभाजी" ह्या मालिकेने संभाजी महाराजांचा इतिहास जगाच्या हृदयात बसवण्याचा खूप मोठा प्रयत्न करतायेत आणि त्याला प्रेक्षकवर्गही तितकी दाद देताना दिसत आहेत. सरनौबत हंबीरमामा मोहितेंपासून ते अनेक स्वराज्य शिलेदार ह्या मालिकेतून जनमाणसांना समजताना दिसत आहेत.

आजपर्यंत संभाजी महाराजांवर अनेक नाटक, चित्रपट झालीत पण ह्यातून खऱ्या इतिहासाला कुठं तरी कात्री लावून, युवराज संभाजी राजांना बदनामीच्या चौकटीत बसवण्याचा प्रयत्न करण्यात आला. जन्मापासून ते मरेपर्यंत छोट्यामोठ्या अनेक अवहेलना भोगत असताना स्वराज्य आत्मसात करून स्वराज्यरक्षण करणारा राजा काळाच्या ओघात इतिहासाने समजूनच घेतला नाही.

जिजाऊंच्या छायाछ्त्राखाली वाढलेलं स्वराज्याचे दुसरे छत्रपती लहानपणापासूनच आपली लीलया दाखवत होते. वयाच्या चौदाव्या वर्षी बुद्धभूषणं नावाचा ग्रंथ लिहून तत्कालीन ज्ञानपंडितांना अवाक करणारे संभाजी राजांनी अजून दोन ग्रंथ लिहिलीत. इंग्रजी, उर्दू, डच सारख्या १४ भाषा येणारे भाषा पंडित संभाजी राजे. युद्धशास्रातील सर्व विद्या अल्पवयात पारंगत करून सुरतेवर स्वतःच्या हिमतीवर चाल करणारे युवराज संभाजी. योग्य न्यायनिवाडा करून कायद्यातील तरतुदींना योग्यवेळी अधोरेखित करून तत्कालीन कायदेपंडितांना विचारात पडणारे राजे संभाजी. लहान वयात जयसिंगराजांना बुद्धिबळात बुद्धिचातुर्य दाखवणारा बुद्धिमान राजा संभाजी. औरंगजेबाला त्याच्या दरबारात प्रतिउत्तर देऊन आपल्या राजपणाचा ठसा उमटवणारे सुज्ञ संभाजी राजे. जगाच्या पाठीवर एकही लढाई न हारता, स्वधर्माचं पालन करताना, छत्रपती शिवरायांचा पुत्र असल्याचं शौर्य असणारा राजा मरणाला सुद्धा हसत हसत हरवून गेला...

संभाजी महाराज उभ्या महाराष्ट्राला आणि जगाला समजायचा असेल तर स्वराज्यरक्षक संभाजी हि मालिका नक्कीच पाहावी आणि आपल्या मराठीपणाची खरी ओळख करून घ्यावी. अशा शूर राजाचा, स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतींचा राज्यभिषेकाचा आजचा दिवस..

डॉ. प्रशांत शिरोडे ..

स्वराज्य रणरागिणी....


स्वराज्य ह्या आपुलकीच्या स्वप्नाला प्रत्यक्षात भूपटलावर साकारणाऱ्या स्वराज्य निर्मात्या राजमाता जिजाऊ..

सह्याद्रीच्या छातडावर सगळीकडे अत्याचाराचा काहूर माजला होता. गणिमीन माणुसकीच कावड लावून घेतलं होत. आयाबहिणी जगण्याचे दिवस मोजत होत्या. गुलामगिरी राजाश्रय घेत होती. स्वाभिमान हैवानांच्या बाजारात हरवला होता. धर्म, संस्कृती आणि संस्कार पोरकी झाली होती. अन्याय, अधर्म आणि अपमान जणू उगवत्या दिवसाचा दिनक्रम झाला होता.. साधुसंतानचा पराक्रमाचा इतिहास जणू वाहत्या पाण्याबरोबर वाहून गेला होता. आपुलकी, स्नेहभाव आणि शिष्टाचार जणू वाऱ्याबरोबर हवेत दिशाहीन झाला होता.. सगळं सगळं काही अघटित घडत होत.

सह्याद्रीला मोकळ्या श्वासाची, माणुसकीला माणूसपणाची, आयाबहिणींना जगण्याची, गुलामगिरीच्या अस्ताची, स्वाभीमाच्या अभिमानाची, धर्म, संस्कृती आणि संस्कार रक्षणाची, आपुलकी, स्नेहभाव आणि शिष्टाचार जपण्याची, साधुसंत शूर पराक्रमाची यशोगाथा उजळण्याची... ह्या सगळ्या सगळ्यांना आस लागली होती स्वातंत्र्याची.. ह्याच स्वातंत्र्याची आस जिजाऊंच्या मनाला कासावीस करत होती.. जिजाऊंना हे सगळं बघवलं जात नव्हतं .. दिवसामागून दिवस जात असताना जिजाऊंच्या मनात एक अस्तित्व उभं राहील आणि ते म्हणजे स्वराज्य... आणि ह्या स्वराज्याच्या स्वप्नपूर्तीसाठी जिजाऊंनी घडवलं एक छत्रपती शिवाजी महाराज नावाचं रामराज्य...

हे स्वराज्य जन्माला घालण्यासाठी जिजाऊंनी काय केलं हे सर्वात महत्वाचं... ह्या स्वराज्यासाठी स्वराज्यप्रमुख जन्माला घातले. नुसते जन्माला नाही घातले तर त्यांना संस्कारांची विचारगाथा मनात रुजवली. अगदी बाळ पोटात असताना रामायण आणि गीतेतून धर्म आणि माणुसकी संरक्षण संस्कार, बाळ जन्माला आल्यावर साधुसंतांच्या संस्कृतीचे संस्कार, बाळ रेंगाळू लागल्यावर इतिहासाच्या पराक्रमाचे संस्कार, बाळ चालू लागल्यावर मैत्रीतल्या प्रेमभावनेचे संस्कार, बाळा पळू लागल्यावर सह्याद्रीच्या यशोगाथेचे संस्कार, बाळ समजू लागल्यावर रणांगणातील शस्राचे संस्कार, बाळ वयात आल्यावर सर्वभूत राजकारणाचे संस्कार, आणि बाळ पराक्रमी झाल्यावर राज्याभिषेकाचे संस्कार.. हे सगळे सगळे संस्कार जिजाऊंनी दिले आणि स्वराज्य प्रत्यक्षात जन्माला आले..

शिवाजी राजांना संस्कारानी घडवणाऱ्या, संभाजी महाराजांना शास्त्रपंडित पराक्रमी घडवणाऱ्या, जनतेला न्यायाच आणि स्वाभिमानाच स्वराज्य देणाऱ्या, साधुसंताना आणि संस्कृतीला उभारी देणाऱ्या, सह्याद्रीला स्वाभिमानाचा ताठ कणा देणाऱ्या राजमाता जिजाऊंना जन्मदिनी मानाचा मुजरा..

जय जिजाऊ.. जय शिवराय..

जय हिंद.. जय महाराष्ट्र..

डॉ. प्रशांत शिरोडे..

साहित्य अन संमेलन...



मराठी भाषा... जगाच्या पाठीवरची एकमेव भाषा, ज्या भाषेचं गेल्या अनेक वर्षांपासून साहित्य संमेलन आयोजित केलं जात. ह्या वर्षी ९२ व  मराठी साहित्य संमेलन यवतमाळ येथे जेष्ठ साहित्यिक "अरुणा ढेरे" ह्यांच्या अध्येक्षतेखाली पार पडणार आहे. १८७८ मध्ये पहिले मराठी साहित्य संमेलन "न्यायमूर्ती रानडे" ह्यांच्या अध्येक्षतेखाली पुण्यात झालं. मराठी भाषेची हि साहित्य संमेलन गोवा, गुजरात, कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि पंजाब सारख्या इतर राज्यातील मराठी संस्कृतीशी निगडित असलेल्या शहरात झालीत.

साहित्य म्हणजे भाषेचं वैभवच ज्यात लेखक, कवी, संगीत, संस्कृती आणि कला ह्यांचा समावेश असतो. ह्या सर्व गोष्टींचा सन्मान जिथे होतो त्याला साहित्य संमेलन म्हणावं लागेल. साहित्य संमेलनात अध्यक्षीय भाषणाला एक वेगळच महत्व असत ज्यातून साहित्याचं, सामन्याच्या मनातलं आणि चालू घडामोडींवर भाष्य केलं जात. अध्यक्षीय भाषणाची दखल सरकारी दरबारातही घ्यावी लागते.

ह्या वर्षीच मराठी साहित्य संमेलन नेहमीसारख वादाच्या भोवऱ्यात सापडलं. जणू साहित्य संमेलन हे कुठल्यातरी वादाशिवीय चालूच होत नाही, हे जणू समीकरणच झालंय. राजकीय वादात तर कुठलीही गोष्ट सापडते आणि ह्या वेळेचं संमेलनही त्याचाच एक भाग झालं. एका इंग्रजी साहित्यिकाला प्रमुख पाहुणे बोलवून, राजकीय द्वेषापोटी त्याची उपस्थिती न राहण्यासाठी नाट्य घडवून आणण्यात आलं. ह्या घटनेनंतर सर्व साहित्यिकांना, लेखकांना जणू बळच आलं. एरवी शेतकऱ्यांची आत्महत्या, सरकारची कामाची पद्धत ह्या विषयात आपली लेखणी बाजूला ठेवणारे जणू कादंबरी लिहतात कि काय? अशी परिस्थती झाली.

असो, आजच चालू होणार अधिवेशन हे ९२ वर्षात पाचव्या अध्यक्षीय महिलेच्या म्हणजेच अरुणा ढेरे च्या मार्गदर्शनाखाली पार पडतंय. हि मराठी साहित्य आविष्काराची यशोगाथा अशीच चालू राहो ह्याच शुभेच्छा.

डॉ. प्रशांत शिरोडे.

नवसंकल्पवर्ष



हे वर्ष किती लवकर संपलं ना? साहजिकच एक वर्ष संपत असताना दुसऱ्या वर्षी नेहमी येणारा सामान्य प्रश्न? कधी चर्चा इंग्रजी नवीन वर्षाची तर कधी मराठी नवीन वर्षाची.. कधी दिवाळीतील नवीन वर्ष तर कधी धर्माच्या रितीनुसार नवीन वर्ष.. इंग्रजांच्या सानिध्यानंतर आणि जागतिक गरजेनुसार इंग्रजी नवीन वर्षाला थोडं जास्त महत्व प्राप्त झालं.

नवीन वर्ष नेहमी काहीतरी नवीन करण्याच्या उमेदीने उगवत. नवीन संकल्पना, नवीन स्वप्न, नवीन स्पर्धा, नवीन लक्ष.. सगळं काही नवीन नवीन मनात येत आणि नावीन्याला किती प्रमाणात सत्यात उतरवायचं हे व्यक्तिपर अवलंबून असत. जुन्या थांबलेल्या गोष्टींना पुढे नेण्याचा संकल्प सुद्धा नवीन सुरवातच असू शकतो.

आता तर बातमी पण वाचायला भेटते कि १ जानेवारीला जिमला व्यायामाला येणाऱ्यांची संख्या खूप असते आणि आठ दिवसात ती पुन्हा आहे तीच होते. म्हणजे व्यायामाचं स्वप्न नवीन वर्षापुरते असते आणि हळू हळू ते कमी होते. संकल्प करायचा तर तो पूर्णत्वाला न्यायचाच असतो आणि तो ध्येय ठेवून वेळात पूर्ण केला तर नक्कीच नवीन वर्षाचं नावीन्य संकल्पपूर्तीनंतर पुन्हा जाणवत.

२०१८ ला अलविदा करताना २०१९ च नवीन ३६५ पानाचं पुस्तक चांगल्या गोष्टींनी लिहलं जावो ह्याच सद्धीच्छा. हे वर्ष नवीन संकल्पनांबरोबर, गावापासून देशापर्यंत आणि देशापासून विश्वापर्यंत सुखाचं जावो. नवीन कल्पना, नवीन स्वप्न, नवीन ध्येय आणि सर्व नवीन प्रत्यक्षात येवो ह्याच हृदयापासून शुभेच्छा..

डॉ. प्रशांत शिरोडे..

आमदार ..


गणपतराव देशमुख एक सर्वसामान्य आमदार. प्रश्न पडला असेल कि आमदार कसा सर्वसामान्य असू शकतो?  आजपर्यंत स्वतःच्या आहे त्याच घरात राहून सर्वसामान्याना सहजपणे भेटता येणारे आमदार. जवळजवळ ५५ वर्ष नेतृत्व केलेलं असताना अजूनही एसटी बसने प्रवास करणारे आमदार. सयुंक्त महाराष्ट्र चळवळीत अभूतपूर्व सहभाग असणारे भारदस्त व्यक्तिमत्व.

देशातील सर्वात जास्त कार्यकाळ असलेला आमदार, म्हणजे ११ वेळा सलग निवडून येणारे ९२ वर्षीय लोकाभिमुख तरुण आमदार. १९६२ साली वयाच्या ३४ व्या वर्षी सांगोला मतदारसंघातून पहिल्यांदा निवडून आल्यानंतर सलग ५५ वर्ष एक मतदारसंघ, एक झेंडा, एक पक्षातून देशात निवडून आलेला एकमेव आमदार. ५१ वर्ष विरोधी बाकावर बसून दुष्काळग्रस्त मदारसंघाला पाणीदार करण्यासाठी लढणारा लढवा आमदार.

आपल्या विजयी घौडदोडीत एकदा १९२ मतांनी पराभव झाल्यानंतर त्या पराभवाचा निकाल सांगण्यासाठी कुठला अधिकारी पुढे येत नव्हता, विजयी उमेदवार मतमोजणी कक्षातून बाहेर येत नव्हता, कार्यकर्ते फेरमतमोजणीची मागणी करत असताना, आमदार साहेब मतमोजणी अधिकाऱ्याला बरोबर घेऊन जनमाणसासमोर निकाल जाहीर करून आपला पराभव आनंदाने स्वीकारला. दिलदार राजकारणीच राजकारणाचा हा अध्याय घडवू शकतो हे तितकच खरं.

गरिबांपासून श्रीमंतांना सहजपणे उपलब्ध असणारा आमदार. सामान्य राहणीमानापासून ते उच्च विचारसारणीपर्यंत जीवनाचा प्रवास करताना महाराष्ट्राच्या राजकारणात अनन्य साधारण स्थान टिकवून ठेवणाऱ्या निष्ठावान आमदार गणपतराव देशमुख यांना भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा..

डॉ. प्रशांत शिरोडे.

शत-प्रतिशत



एक्सिट पोल म्हंटल कि किती विश्वास ठेवावा आणि किती नाही तेच समजतं नसत. आताच पाच राज्यांच्या निवडणूका झाल्या आणि त्यात एक्सिट पोल गेल्या चारवर्षांपेक्षा थोडे वेगळेच आले. सत्ताधारी पक्षाने नेहमीप्रमाणे विजयरथाची चाक तयारच ठेवली होती आणि दुसऱ्या पक्षांनी आपली मनाची धास्ती मनात जागीच राहू दिली होती. पाच राज्यांच्या निवडणुकीचा एक्सिट पोल प्रत्यक्षात कितपत खरा ठरतो ह्याची प्रतीक्षा आज संपली आणि निकाल जवळजवळ एक्सिट पोलच्या अनुमानानुसार लागला आणि सत्ताधारी पक्षाची विजयरथाची चाक जागेवरच उभी राहिली.

सत्ता एक अशी गोष्ट आहे जिचा उपयोग केला तर सन्मान होतो आणि दुरुपयोग केला तर अपमान होतो. ६० वर्ष सत्ता भोगणारी काँग्रेस सत्तेच्या नशेतून जनतेने उतरवली आणि त्याच सत्तेची नशा भाजपालासुद्धा लवकर चढली आणि जनतेने एकाच वेळेस त्यांची हि नशा ह्या निवडणुकीत उतरवली. २०१४ नंतरच्या कुठल्याही निकालानंतर भाजप कार्यालयासमोर मंडप, फटाके आणि जलोषाबरोबर प्रतंप्रधानाचं भाषण व्हायचं, आज मात्र सगळं शांत होत आणि जिथे शुकशुकाट असतो तिथं आज जलोषाच वातावरण बघायला भेटत होत. कदाचित सत्ताधीशाना जनता जनार्दनाचा कल आतातरी चांगलाच समजलेला दिसतोय, असं ह्यातून समोर येतंय.

सत्तेवर असताना जनता जनार्दनाचा विचार न करता हुकूमशाही दाखवणं महागातच पडत. जनता सत्तेत बसवते, पण त्या सत्तेचा उपद्रव केला तर खालीही खेचते हे आजच्या निकालावरून स्पष्ट होताना दिसतंय. आंतरराष्ट्रीय स्थरावर देशाचं नाव वरती नेताना राष्ट्रीय स्थरावर सामन्यांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न झाल्यामुळे शत प्रतिशत पराभव स्वीकारावाचं लागेल. राम मंदिर, पाकिस्तानला समज, काश्मीरचा कायदा यांचा विसर आणि नोटबंदीसारखे अनेक हेकेखोरपणाने नियोजनशून्य घेतलेले निर्णय ह्या निवडणुकीतून निकालात अवतरले.

मोदी-शहा जोडीने ह्या निकालानंतर एका राज्यापुरताचा विचार सोडून संपूर्ण राष्ट्राचा विचार प्रामाणिकपणाने करून जनतेच्या मनातील, भाजप अंतर्गत नेत्यांच्या सहमतीने, मित्र पक्षांबरोबर कूटनीती न करता हेकेखोरपणा सोडला तर नक्कीच शत-प्रतिशत राहतील. शेवटी भाजप जर दुसरं काँग्रेस होत असेल तर जनता त्यांना शत-प्रतिशत घरचा रस्ता दाखवेलच..

डॉ. प्रशांत शिरोडे.

भीमपर्व..


उधारली हजारो कुळे...
भीमा तुज्या जन्मामुळे..

स्वतंत्र पूर्वीच्या काळात समाजमान्य चालीरीतींत वावरणाऱ्या एक उपेकषित वर्गाला त्यांच्या जीवन पद्धतीची जाण करून देण्यासाठी आपलं आयुष्य पूर्ण झोकावणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर.. त्या काळातल्या भारतीय शैक्षणिक अधोगतीत सुद्धा उच्च शिक्षण घेऊन समाज कार्य आणि राष्ट्र कार्य करणारा महापुरुष..

समाजहितासाठी काही विशिष्ट वर्गाला सवलती काही विशिष्ट वेळेसाठी नमूद करून एक संविधानिक दर्जा देणारा माणूस. पण काळाच्या ओघात राजकीय फायद्यासाठी त्या विशिष्ट वेळेला नाकारण्यात आलं जे बाबासाहेबाना कदापि मान्य नव्हतं.. उपेक्षित वर्गाच्या उत्कर्षासाठी ठरवून दिलेल्या सवलती कालमर्यादेपेक्षा जास्त काळ किंवा राजकीयहेतूने कायमस्वरूपी केल्यामुळे सामाजिक विषमता कमी होण्याऐवजी ती जास्त वाढताना दिसते.

छत्रपती शिवरायांचा आदर्श समोर ठेवून जागतिक संविधानाचा अभ्यास करून राज्यघटना लिहणाऱ्या समितीत आपली भूमिका बजावणारे बाबासाहेब... समाजातील उपेक्षित वर्गाला सवलतींचा फायदा होऊन तो समाज मुख्य प्रवाहात यावा जे बाबासाहेबांचं मुख्य उद्धिष्ट होत. पण अलीकडच्या काळात उपेक्षित वर्गापेक्षा अपेक्षित वर्ग त्याचा फायदा घेताना दिसतोय..

निळ्या आकाशासारखे अविरत अभ्यास करणारे बाबासाहेब आणि त्यांचं भीमपर्व सध्य स्थितीत जातीच्या पुस्तकात सिमीत होत असताना एक मराठी म्हणून बाबासाहेबाना ६२ व्या महापरिनिर्वाणदिनी भावपूर्ण आदरांजली.

डॉ. प्रशांत शिरोडे..

कांद्याचे अश्रू ...



कांदा चिरतांना डोळ्यात पाणी येत तसंच सध्या कांदा विकताना शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी येताना दिसतंय. कांदा सामान्यांना पोट भरण्यासाठी चिरताना डोळ्यात पाणी देतो तर तोच कांदा शेतकऱ्याला त्याच्या कष्टाचं फळ न मिळाल्यामुळे डोळ्यात पाणी देतो. सध्याची परिस्थिती तशीच आहे, कांद्याचा बाजारभाव १.५० रुपये किलो आहे. कांदा पिकवून योग्य भाव येईपर्यंत साठवला जातो, ज्याचा खर्च साधारणतः ३-४ रुपये प्रति किलो येतो. पण आजचा बाजारभाव बघितला तर कांदा १-२ रुपये किलो भावाने विकला जातोय, म्हणजेच ह्या भावात शेतकऱ्याला उत्पादन खर्चही मिळत नाही.

सध्याची दुष्काळी परिस्थिती बघता कांद्याबरोबर सर्व पिकांचं उत्पन्न कमी आहे म्हणून त्याचा बाजारभाव जास्त असेल अशी सामान्य शेतकऱ्याची भावना आहे. शेतकऱ्याची हि भावना सरकारला कळत नाही, अस मुळीच नाही, पण त्यांना नेहमीप्रमाणे राजकीय स्वार्थ्याचं पडलेलं असत. आताही तसंच झालं, चार राज्यांच्या निवडणूका चालू असल्याने मतांच्या राजकारणाकरता शेतकऱ्याला बळीचा बकरा बनवलंय.

शेतीमालाला भाव असणं म्हणजे भीक मागितल्यासारखं झालय. आम्ही दीडपट भाव देऊ म्हणणारे उत्पादन खर्चाचा निम्मा भाव देतायेत. हे तर सरकारच झालं हो, पण शहरी माणूसही हि २-४ रुपये भाव वाढला कि अशी प्रतिक्रिया देतो कि जणू आभाळच कोसळलंय. पिझ्झा, बर्गर खाण्यासाठी ५०० रुपये गेले तरी कुठलीही कुरकुर न करणारे ५ रुपये कांद्याचा भाव वाढला कि बोंबाबोंब करतात. अश्या लोकांनी शेतकऱ्याची मेहनत, परिस्थिती आणि जगण्याची पद्धत एकदा जाऊन बघायला हवी.

कांद्याचा एक अश्रू चवीच्या आनंदासाठी तर एक अश्रू अथक कष्टाच्या फळासाठी.. एक असतो खवय्यांसाठी तर एक असतो शेतकऱ्यांसाठी.. शेतीप्रधान देशात शेतकरी नावाला राजा म्हणवला जातो, पण प्रत्यक्षात ह्या राजाचे प्रजेपेक्षा वाईट हाल असतात. सातवा वेतन आयोग लावणाऱ्या सरकारने शेतकऱ्याला जगण्यासाठीच वेतन हमीभाव स्वरूपात दिल तरी तो जगण्याची आशा सोडणार नाही.

डॉ. प्रशांत शिरोडे.

मराठी रंगभूमी... कडक..



कडक.. शब्द थोडा वेगळा वाटला ना.. हो वेगळाच आहे त्याच असं कि ह्या आठवड्यात दोन मराठी चित्रपटांनी हिंदी चित्रपटांना तिकीट खिडकीवर चांगलंच खाली खेचल, त्याच एका चित्रपटातील हा मुख्यशब्द. ज्या चित्रपटगृहांना नेहमी मराठीच वावडं असत त्या चित्रपटगृहांनी "आणि डॉ. काशिनाथ घाणेकर" आणि "नाळ" ह्या दोन मराठी चित्रपटांना जास्त शो देऊन हिंदीतले बादशाह अमिताभ बच्चन आणि अमीर खान यांची भूमिका असलेला "ठग्ज ऑफ हिंदुस्थान" ह्या चित्रपटाचे शो कमी केलेत. आकडे सांगायचे झाले तर ठग्ज ऑफ हिंदुस्थान १३३३ च्या शो वरून १५० शो केलेत आणि नाळ चे ३०० वरण ४०० शो केले त्याबरोबर आणि डॉ.काशिनाथ घाणेकरचे १७७ वरण ३१० शो केलेत.

मराठी रंगभूमीचे सध्याचे चित्रपट काही वेगळेच आहेत. श्वास चित्रपटापासून ते मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, सैराट, नटसम्राट सारख्या एकाहून एक अभूतपूर्व चित्रपटांची हि यशस्वी शृंखला "आणि डॉ. काशिनाथ घाणेकर" आणि "नाळ" ह्या जबरदस्त चित्रपटांपर्यंत येऊन पोहचली. ह्या दोन्ही चित्रपटांनी जणू मराठी रसिकवर्गाला पुन्हा तिकीट खिडकीवर खेचून हिंदी चित्रपटांना नुसत मागे टाकलं नाही तर अमराठी प्रेक्षकांनाही आपल्या कलेच्या मोहात ओढलं. खरं तर मराठी चित्रपट हे मुद्देसूद आणि एक योग्य कथानकाला जोडून असतात पण हिंदीच्या वर्चस्वापुढे कुठे तरी कमी पडतात. असो पण आता दिवस बदलतायेत.

"आणि डॉ. काशिनाथ घाणेकर" ह्या चित्रपटात मराठी नव्हे तर साऱ्या चित्रपट श्रुष्टीवर अदभूत लाभेलला एक कलाकार ज्याने ह्या भूमीवर कलेचा वेगळा अविष्कार पहिल्यांदा दाखवला. मराठी रंगभूमीला पहिली टाळी, पहिली शिट्टी मिळवून देणारा आणि मुख्य कलाकाराच नाव शेवटी सांगण्याची प्रथा देणारा कलाकार म्हणजे डॉ. काशिनाथ घाणेकर. ह्या महान कलाकाराच्या भूमिकेला तितकीच कडक दाद देणारा सुबोध भावे मनाला खूप भावून जातो.

"नाळ" ह्या चित्रपटातून रसिकप्रेक्षकांना भावुक करणारी एक वेगळी निर्मिती समोर आणली आहे. ८ वर्षाच्या श्रीनिवास पोखळे च्या अभिनयाचं कौतुक करावं तेवढं कमीच. एका लहान मुलाने प्रेक्षकांच्या नजरा शेवटपर्यंत टिकवून, चित्रपटातील भूमिकेला पूर्ण न्याय देताना उत्तम कथानकातून रसिकप्रेक्षकांच्या डोळ्यातील अश्रुना वाट मोकळी करून देतो.

मराठी रंगभूमीची यशस्वी शृंखलेची हि "नाळ" अशीच टिकून राहो आणि रसिकप्रेक्षकांना एकसे बढकर एक चित्रपट भेटीला येवो ह्याच "कडक" सद्धीच्छा..

डॉ. प्रशांत शिरोडे.

सरसेनापती मराठीमनाचा ..


महाराष्ट्राच्या मातृभूमीने अनेक संतांना, वीरपुरषांना, स्वातंत्र्यसैनिकांना, शूरवीरांना, सैनिकांना आणि शास्त्रज्ञाना जन्म दिला. ह्या पावन भूमीची शौर्याची यशोगाथा अगणित आणि अविभूतीत आहे. हिमालयाला जेव्हा जेव्हा गरज पडली तेव्हा तेव्हा हा सह्याद्री हिमालयाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. ह्या मराठमोळ्या भूमीने जन्म दिला संत तुकारामांना, छत्रपती शिवाजी महाराजांना, स्वातंत्र्यवीर सावरकरांना, ज्योतिबा फुलेंना आणि ह्याच शृंखलेत जन्म दिला बाळासाहेब ठाकरेंना ...

शूरवीरांच्या भूमीला नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानाला नव्हे नव्हे तर पूर्ण जगाला राजकारणाची वेगळी ओळख करणारा एक वेगळा राजकारणी. अस्सल ठसठशीत मराठमोळा अभिमान असणारा मराठी माणूस, शिवरायांच्या यशोगाथेला अभिमानाने गौरवास्पद करणारा शिवसैनिक, शिवसेना नावाची मराठीमोळी संघटना उभा करणारा क्रांतिकारी, मुंबई महाराष्ट्रात राहण्यासाठी लढणारा महाराष्ट्र सैनिक, व्यंगचित्रांच्या रेषांतून परिस्थितीची जाण करून देणारा व्यंगचित्रकार, हिंदुस्थानातील हिंदूंसह सर्व धर्माना धर्माभिमान शिकवणारा धर्मप्रेमी, सामान्यांना आपलं वाटणारा असामान्य व्यक्तिमत्त्व म्हणज़े बाळासाहेब..

राजकारणात सत्ता नसताना सुद्धा समांतरित सत्ता लोकांच्या हिमतीवर चालवणारे, तोंडातून एकदा निघालेला शब्द कधीच परत न घेणारे, कुणाचीही मदत करण्यासाठी नेहमी आपली सत्ता वापरणारे, शिवरायांना डोक्यापासून तर हृदयापर्यंत आत्मसात करणारे, परदेशी लोकांनी ह्या भूमीत येण्याअगोदर शिवरायांचं नाव घ्यावं म्हणून मुंबई विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस नाव देणारे, देशातील पहिली ट्रेन ज्या स्थानकावर धावली त्या स्थानकाला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस नाव रूपाला आणणारे, मुंबईत राहून पाकिस्तान सारख्या विरोधकांना धडकी भरवणारे, अश्या अनेक अनेक राजकारणाचे पैलू असताना सतेच एकही पद न घेता देशहितासाठी असंख्य गोष्टी करणारे अदभूत शिवसेनाप्रमुख...

बाळासाहेब नावाचं वादळ हे शेवटच्या श्वासापर्यंत मराठमोळ्या, हिंदुस्थानी आणि शिवसैनिकांच्या मनात बसलेलं आहे. अखेरच्या श्वासात सुद्धा जम्मू काश्मीर पासून ते कन्याकुमारीपर्यंत सारा देश त्यांच्यासाठी प्रार्थना करत होता. जगाचा निरोप घेताना सुद्धा बाळासाहेबांनी पराक्रमाची गाथा चालू ठेवली. हिंदुस्थानातील सर्वात मोठी अंतयात्रा हि लोकमानसात प्रेम असल्यामुळे दिसून आली आणि त्या दिवशी खर्याअर्थानें कधी न थांबणारी मुंबई नावाची धावती दुनिया सुद्धा थांबली होती.

बाळासाहेब तुम्ही महाराष्ट्र नावाच्या शिवरायांच्या विश्वात जन्माला आलात हा आम्हा मराठीमाणसाचा गौरवच म्हणावा लागेल. बाळासाहेब तुम्ही गेलात हे आज पण खरं वाटत नाही कारण तुमच्याबद्दलचा आदर आणि तुमचा दरारा आज पण तेवढाच आहे आणि भविष्यात तो तसाच राहील.. आपण खरंच अदभूत आणि अद्वितीय होता आणि राहाल..

राजकारणापलीकडचा महामाणूस, हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आदरपूर्वक भावपूर्ण श्रद्धांजली..

जय हिंद, जय महाराष्ट्र ..

(राजकीय वारसा -२)

डॉ. प्रशांत शिरोडे.

गर्व से कहो..

प्रभु श्रीराम काल अनेक वर्षाच्या वनवासानंतर जन्मस्थळावर मोठ्या सम्मानाने विराजमान झाले.. हया दिवसाच खर श्रेय जात ते हिंदूहृदयसम्राट बाळासाहे...