सत्ता ...


सकाळी झोपेतून उठल्यावर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी पाहून अनेकांची थोडी राहिलेली झोपच उडाली. झोप उडण्याच कारण म्हणजे रात्रीपर्यंत सत्तेची गणित जुळत असताना आज वेगळाच काहीतरी घडताना महाराष्ट्राला दिसतंय.

युती आणि आघाडी निवडणूकीपुरता होत, राजकीय पक्षांची खरी भूक हि सत्ता होती. सर्व एकाच गोष्टीसाठी धडपडत होते ती म्हणजे सत्ता. मग पक्षनिष्ठा, शब्दनिष्ठा हे सर्व काळाच्या ओघात संपण्यात जमा झालं. सत्ता एकच निष्ठा बाकी दुसरं काहीही नाही, हेच आताच्या राजकारणाचं फलित आहे. महाराष्ट्राचं राजकारण नेहमी महाराष्ट्रात राहील पण आताच्या राजकारणाला दिल्लीची काळी नजर लागली असं दिसून  येत. स्वाभिमान, अभिमान जणू मानपणाच्या गर्दीत हरवून गेलेत..

प्रत्येक पक्ष सत्तेचा भुकेला असताना सतेची गणित हि सत्यासाठी नाही तर स्वार्थासाठी आहेत हे म्हणणं तितकच योग्य ठरू शकत. महाराष्ट्राने ह्या एक महिन्यात अनेक समीकरणे बघितली, राष्ट्रपती लागवट पण बघितली आणि राहिलेलं अवेळी मुख्यमंत्रीपदाची शपथ हि बघितली. विशेष म्हणजे इतक्या सकाळी सरकारी काम आणि त्यात राज्यपालांकडे जाऊन शपथविधीही होणं आणि राष्ट्रपती राजवट पण मागे घेणं, हे सर्व काहीतरी अघटित झाल्यासारखं होत. कदाचित राज्यपालही ह्या घडामोडींचे प्यादे असतील, पण ते नसावेत म्हणजे लोकशाहीला काहीतरी अनुसरून झाल्यासारखं असेल.

अजून महाराष्ट्राला काय बघायला भेटत ते बघावच लागेल. कदाचित महाराष्ट्राला याची आतुरता न राहता महाराष्ट्राला ह्या राजकारणाची चीड येऊ शकते. राजकारणाचं काय होत ते होतच राहील पण ह्यातून खरंच शिकण्यासारखं आहे, ते म्हणजे सत्तेसाठी होणार राजकारण आपापसातले संबंध न बिघडवता ह्या गोष्टींना हलकंफुलकं घेणंच महत्वाचं आहे...

आता प्रतीक्षा महाराष्ट्राच्या नव्या राजकारणाची..

डॉ. प्रशांत शिरोडे..

सूत्र...



सूत्रांच्या माहितीनुसार किंवा विश्वसनीय सूत्रांनुसार किंवा खात्रीलायक सूत्रानुसार हे शब्द इलेक्ट्रॉनिक मीडियावर नेहमी ऐकू येतात, पण सध्याच महाराष्ट्राचं राजकारण बघितलं तर ह्या सूत्रांनी राजकीय पक्षांपेक्षा जास्त काम केलेलं दिसत.

सूत्रांनी विश्वसनीय आणि खात्रीलायक होताना महाराष्ट्राचा मुख्यमंत्रीच नव्हे तर मंत्रिमंडळच बनवून टाकलं. युती आणि आघाडी पेक्षा सुंत्राचीच माहिती जास्त येत होती, ती इतकी कि नवीन होणारी आघाडी जणू सुत्रानीच घडवून आणली काय? असा प्रश्न सामन्यांना पडू लागला. नवीन होणाऱ्या आघाडीला सूत्रांनीच महाशिवआघाडी आणि नंतर महाविकासआघाडी नाव देऊन टाकलं. सूत्रांनी संभाव्य मंत्रिमंडळ बनवलं, सूत्रांनी अनेक फार्मुले बनवली.. खरंच ह्या सूत्रांच कुतुहूलच..

ह्या सूत्रांनी बाकी कमालच केली, बंददरवाजाआडच्या बैठकीतले विषय सुध्दा सूत्रांनी आम जनतेसमोर आणलीत. सूत्रांनी तर नेत्यांच्या मनातल्या गोष्टीसुध्दा ओळखून सांगून टाकल्या. सरकार स्थापण्यासाठी पाठिंब्याचं पत्र प्रत्यक्षात अजून भेटलं नाही पण खात्रीलायक सूत्रांनी ते पोहचल्याच सांगूनही टाकलं. सूत्रांनी अनेकांच्या भेटीगाठीही परस्पर घडवून आणल्या आणि त्या भेटीगाठीनमधले निर्णयही सांगून टाकले.

नक्की हे सूत्र कोण असतील? हा प्रश्न जणू सगळ्यांनाच पडला असेल.. कदाचित हा प्रश्न महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असेल? ह्या प्रश्नापेक्षा जास्त महत्वाचा झाला आहे. हि सूत्र म्हणजे त्या पक्षातील कोणी व्यक्ती असतील किंवा त्या ठिकाणी काम करणारे नौकर किंवा पत्रकारांच्या मनातलाच असू शकतो. जो असेल तो पण सूत्रांनी काम मात्र अगदी जोमानं केलं, क्षणभरासाठी सामान्यांच्या मनातील प्रश्नांना उत्तर देवून तात्विक समाधान करून टाकलं.

आता प्रतीक्षा सरकार बनण्याची आणि खात्रीलायक सूत्रांची माहिती विश्वसनीय होण्याची...

डॉ. प्रशांत शिरोडे..

खेळ मांडला...



महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हाच विषय सत्तेसाठी महत्वाचा ठरला.. निवडणुकीच्या आधी नेत्याची पक्षनिष्ठा खुंटीला टांगलेली बघितलेली असताना आता पक्षाचीच निष्ठा खुंटीला टांगलेली महाराष्ट्राने बघितली. एकंदर निष्ठा, प्रतिष्ठां ह्या राजकारणातील गोष्टी इतिहास जमा झाल्यासारखं दिसतंय..

युती आणि आघाडी जणू राजकीय परिस्थिती पाहून जुळवाजुळव करतायेत.. वैचारिक मतभेद असतील तर राजकीय मत एक होताना दिसतायेत. सत्ता केंद्रस्थानी असं महत्वाचं आहे आणि ते असावं कारण सत्तेचा उपयोग जसा होतो तसा दुरुपयोगही करता येतो हे मागील सरकारने राज्यात करून दाखवलं. सत्तेतून सामन्याचे प्रश्न सोडवण्यापेक्षा राजकारणातील चढाओढ कशी करता येईल ह्याकडे आवर्जून लक्ष दिल गेलं.

पुरोगामी महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासाला शोभेसा निकाल महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत लागला. महाराष्ट्र जणू आता आमची मक्तेदारी आहे आणि आम्ही म्हणू तेच होईल अश्या दुनियेत असणाऱ्या लोकांना महाराष्ट्राने सत्तेच्या गणितापासून दूर ठेवलं. सत्तेचं गणित अपुरं पडत असताना सुद्धा आम्ही म्हणू तेच ह्या अविर्भावात असल्यामुळे सत्तेची चावी मागील सत्ताधाऱ्यांच्या हातून जाताना दिसतेय. मित्रपक्षाला ठरवलेली पद देण्यापेक्षा विरोधात बसणं महत्वाचं मानलं गेलं. ह्यातून प्रादेशिक पक्षांना कमी लेखण्याशिवाय दुसरी कोणतीही भावना दिसत नाही.

राज्यातला शेतकरी अवकाळी पावसाने होरपळला आहे पण ह्याची जाण राजकीय पक्षांना नाही कारण त्यांचा सत्तेचा खेळ काही संपताना दिसत नाही. राज्याच्या विस्कटलेल्या घडीला बसवण्यासाठी आता सरकारची गरज आहे. राष्ट्रपती लागवट राज्याला न परवडणारी आहे. सत्तेचं गणित जुळवताना राज्याने चांगले धडे दिले जेणेकरून कोणी राज्याला आपली मक्तेदारी समजणार नाही. ज्या राज्याने अनेक चांगली सरकार बघितली, आज तेच राज्य सत्तेसाठी, सरकारसाठी आस लावून बसलंय.

जी सत्ता नीती बिघडवताना दिसतेय, तीच सत्ता चांगल्या नीतीने राज्याच्या विकासाला गती देवो ह्याच सदभावना..

डॉ. प्रशांत शिरोडे..

ठाणेकरांनो.. माणूसकीसाठी ..


आई आणि बाळाचं नातं काही वेगळंच असत. जगाच्या पाठीवर वावरताना अगदी पोटातील नाळेपासून ते रोजच्या जगण्यापर्यंत हे नातं निराळच असत. असंच, अविनाश जाधवांच फेसबुक अकाउंट बघत असताना एका आईची आणि बाळाची मनाला धक्का लावून जाणारी पोस्ट बघितली..

बाळाची तब्येत बरी नसल्यामुळे त्याला हॉस्पिटल ऍडमिट केलं होत. एक महिना झाल्यानंतर त्याच बिल साडेतीन लाखापर्यंत झालं होत. ते कुटुंब ७० हजारापर्यंत बिल भरू शकत होत, हॉस्पिटलने आईला आणि बाळाला पुढचे १८ दिवस फक्त बाळाला दूध पाजण्यापुरतं १५ मिनटं भेटू दिल. पैश्यांसाठी बाळाचे आईवडील टाटा, गोपाळ शेट्टी, शाहरुख खान, सलमान खान अश्या मदत करणाऱ्या लोकांच्या ऑफिसला गेले पण त्यांना कुठूनही मदत भेटली नाही. नंतर ३ दिवस हॉस्पिटलने आईला बाळाला भेटू देण्याचं बंद केलं.

आईबापांचा जीव कासावीस झाला आणि कुठूनही मदत मिळत नसताना ते मतदीसाठी अविनाश जाधवांकडे पोहचले. अविनाश जाधवांनी कुठलाही वेळ न घेता सरळ हॉस्पिटल गाठलं आणि बाळाला स्वतःच्या हाताने हॉस्पिटल बाहेर आणून आईवडिलांच्या हाती सोपवलं. त्या आईवडिलांना हे सगळं बघून काय करावं आणि काय नाही असं झालं. आनंदाच्या भरात भरल्याडोळ्यानी आईवडीलांनी अविनाश जाधवांचे पायच धरले आणि आपसूकच बोलले तुम्ही आमच्यासाठी देव आहात. विशेष म्हणजे हे कुटुंब उत्तर भारतीय होत. हे मुद्दामून नमूद करण्याचं कारण माणूसकीसाठी ते काहीही न बघता धावून गेले.

माणुसकीसाठी कशाची पर्वा न करणाऱ्या अविनाश जाधवांना जर ह्याबद्दल विचारलं तर त्यांचं मत असत "सामान्य माणसावर अमानुष अत्याचार होत असेल तर तो मला सहन होत नाही. मी हाथ जरी उचलला तरी तो सामन्यानवर उचलला नाही. जिथे चुकीचं तिथेच आम्ही टोकाची भूमिका घेतो, शेवटी आम्ही माणूसच आहोत आणि आमच्या इतकी माणुसकी कोणी दाखवणार नाही हेही तितकंच खरं आहे. मी आजपर्यंत हे सर्व निस्वार्थपणे केलं. मला हीच सेवा प्रतिनिधी म्हणून करायची आहे.."

ठाणेकरांनो, माणूसकीसाठी आणि आपल्या हक्काच्या माणसासाठी अविनाश जाधवांमागे उभं राहणं आपली जबाबदारीच आहे..

डॉ. प्रशांत शिरोडे.

ठाणेकरांनो ... फेरीवाला..


एल्फीस्टन स्टेशनच्या चेंगराचेंगरीनंतर अमानुष लोकांचे हकनाक बळी गेले. ह्या घटनेमागे अनेक कारण होती, आणि त्यातलं एक कारण म्हणजे फेरीवाला.. ह्याच्या विरोधात राज ठाकरे यांनी मोर्चा काढला आणि फेरीवाला मुक्त रेल्वे स्टेशन परिसरासाठी मनसे रस्त्यावर उतरली. रेल्वे अधिकारी, पोलीस आणि संघटना यांची मिलीभगत ह्या फेरीवाल्याना पाठीशी घालत होती. राज ठाकरेंच्या आव्हानाला साथ देताना ठाणे रेल्वे स्टेशन फेरीवालामुक्त करण्यासाठी जो माणूस अग्रेसर होता तो म्हणजे "अविनाश जाधव"..

मध्यरेल्वेवरच सर्वात जास्त वर्दळीच स्टेशन म्हणजे ठाणे स्टेशन. सुमारे ४००-४५० फेरीवाल्यांच्या साखळीने ठाणे स्टेशनला घेरलं होत. सामान्य प्रवाश्याला लोकल इतकाच स्टेशन परीसरात जीव मुठीत घेऊन चालावं लागत होत. फेरीवाल्यांची दडपशाही वाढली होती, कदाचित त्यांच्यावर प्रशासनाचा हप्त्यांच्या मायेने आशीर्वाद होता. प्रवाशांचे होणारे हाल कोणाला दिसत नव्हते. मुंबई ठाणेसह सर्व उपनगरात हि दयनीय अवस्था होती.

ऐन दिवाळीत भाऊबीजेच्या दिवशी अविनाश जाधव आपल्या कार्यकर्त्यांसोबत ठाणे स्टेशन परिसरात जाऊन फेरीवाल्यांच्या अतिक्रमणाविरुद्ध उतरला. बघता बघता स्टेशन फेरीवालामुक्त होण्यास सुरवात झाली आणि ती २-३ महिने व्यवस्थित राहिली आणि नंतर पुन्हा तीच परिस्थिती दिसू लागल्यानंतर पुन्हा आंदोलन केल्यामुळे आजपर्यंत स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त आहे. भाऊबिजेसारख्या सणाच्या दिवशी जनसामान्यांच्या सोयीसाठी आंदोलन करून दिवाळीसारख्या सणाच्या दिवसात चार दिवस तुरंगात काढणारा व्यक्ती म्हणजे "अविनाश जाधव".

अविनाश जाधवांना विचारलं तर त्यांचं मत असत "सामान्य माणूस घरातून निघताना जीव मुठीत घेऊन निघतो आणि स्टेशन परिसरात फेरीवाल्यांच्या गराड्यात अडकतो. सामान्य माणसाला मोकळा श्वास घेता यावा. चेंगराचेंगरी सारखा प्रकार होऊ नये. स्टेशन स्वच्छ व सुंदर व्हावं हि त्यामागची भूमिका आहे. कोणाच्या पोटावर पाय ठेवणं आमची संस्कृती नाही, पण जनतेचं रक्षण करण हि आमची प्राथमिकता आहे".

मग ठाणेकर विचार काय करतायेत? आपलं मत मोकळ्या श्वासासाठी, आपलं मत फेरीवालामुक्त स्टेशन परिसरासाठी..

आपलं मत अविनाश जाधवांनाच...

डॉ. प्रशांत शिरोडे.

ठाणेकरांनो... पुरग्रस्तांच्या मदतीसाठी..



ऑगस्ट महिन्यात सांगली कोल्हापूर ह्या पश्चिम महाराष्ट्राच्या भागात पावसाने थैमान घातलं आणि अनेक गावांना पुराच्या पाण्याने वेढलं. झोपलेलं सरकार, नियोजनशून्य कारभार, श्रेयाच राजकारण ह्याशिवाय काहीही दिसलं नाही. देश स्वातंत्र्यदिन साजरा करत असताना हा पूरग्रस्त भाग स्वतःच्या जीवाला ह्या संकटातून स्वातंत्र्य करत होता. अचानक आलेल्या ह्या नैसर्गिक आपत्तीत होत्याच नव्हतं झालं. निसर्गाचा विकोप बघवत नव्हता. माणसं जीव मुठीत घेऊन जगण्यासाठीची खटाटोप करीत होते. सगळं सगळं काही भयानक होत.

महाराष्ट्राच्या अनेक भागातून मदतीचा ओघ सुरु होता. कोणी खाण्याच्या वस्तू, कोणी औषध तर कोणी कपडे पाठवत होत. सगळीकडे पाणीच पाणी असताना मदत पोहोचवणं तसं अवघड काम होत. शौर्याची भूमी जणू संकटाची भूमी झाली आणि तिला अवघ्या महाराष्ट्राची आस लागली. दिवसा मागून दिवस जात होते पण पाऊस काही थांबत नव्हता.. अनेक मदती पोहचल्या पण प्रत्यक्षात जावून मदत करणारे अगदी थोडे होते आणि त्यात अग्रभागी एक नाव होत ते म्हणजे "अविनाश जाधव".

०९-१० ऑगस्टला ठाण्यात मदतीची हाक देवून हा ध्येयवेडा माणूस, मराठी माणसाच्या मदतीसाठी स्वतः हि मदत घेवून सांगलीत पोहचला. मदत करणाऱ्यांपैकी जास्त लोक शहरी भागात पोहचले पण अविनाश जाधव आपल्या टीमसह खेड्या गावात पोहचले. सांगली तालुक्यातही अमनापूर आणि ब्रह्मनाळ गावांना प्रत्यक्ष मदत केली. ब्रह्मनाळ गावात बोट उलटून १७ लोकांचा मृत्यू झाला तिथे भेट देवून त्यांचं सांत्वन केलं. अश्या परिस्थितीत रात्रंदिवस पाच दिवसापासून काम करणाऱ्या महाराष्ट्र सैनिकांचं मनोबल वाढवलं. त्यानंतर इचलकरंजी आणि मिरजमधील गावांमध्ये मदत करून. कोल्हापुर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील टाकोडा गावात जाऊन लोकांची मदत करताना मनस्थिती समजून घेतली. नुसती मनस्थिती नाहीतर तिथल्या घरांचं पुनर्वसन करण्याची जबाबदारी स्वतःच्या अंगावर घेतली आणि त्यासाठी अजूनही काम करताना हा माणूस धडपडताना दिसतोय.

ठाणेकरांनो, ठाण्याच्या बाहेर जाऊन मदत करणारा हा माणूस ठाण्यातील संकटात नेहमीच कामी येतो. ह्या विषयावर अविनाश जाधवांना प्रत्यक्ष विचारलं तर ते म्हणता "माझा मराठी माणूस संकटात मला बघवला जात नाही, माझा मराठी माणूस त्याच्या भूमीत हक्काने सुखी रहावा, मग ते नैसर्गिक संकट असो वा मनुष्यनिर्मित संकट असो. कोणीही नसेल तरी मी नक्कीच असेल..". संकटात सुखदुःखात मदतीला धावून येणाऱ्या अविनाश जाधवांना सरकारात पोहचवण्याची जबाबदारी तुमचीआमची..

मग विचार काय करता? आपलं मत संकटात धावून येणाऱ्या ध्येयवेड्या माणसासाठी... आपलं मत मराठी माणसाच्या संरक्षणकर्त्यासाठी..

डॉ. प्रशांत शिरोडे..

ठाणेकरांनो



ठाणे म्हणजे दहीहंडी सणासाठी ओळखलं जाणार शहर. स्वर्गीय आनंद दिघे साहेबांच्या प्रेरणेने ह्या सणाचं महत्व द्विगुणित झालं. ह्याच सणाच्या निम्मिताने एक-दोन महिने सराव करून मराठी तरुण एकत्र येतात. मराठी माणसाला एकत्र आणणारा हा मराठमोळा सण.. मराठी तरुणांना ह्या सणाची एक वेगळीच आतुरता लागलेली असते..

मराठमोळ्या ह्याच सणावर काही वर्षांपूर्वी निर्बंध आणण्यात आले. सगळीकडे हा सण इतिहासजमा होण्याचं वातावरण झालं. सत्तेत असणारे अकार्यक्षम झाले होते. न्यायालयाने ह्या सणावर जाचक अटी लादल्या. मराठी तरुण हतबल झाला. मराठी सणाची आणि मराठी तरुणाची हि हतबलता एका महाराष्ट्र सैनिकाने हेरली तो म्हणजे "अविनाश जाधव" ..

न्यायालयाचा आदेश असताना, मनात न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान करण्याची कुठलीही इच्छा नसताना, हा माणूस दहीहंडी मराठी सण साजरा करण्यासाठी मैदानात उतरला. "जय जवान" सारख्या जगप्रसिद्ध गोविंदा पथकाने अविनाश जाधवांच्या तळमळीला होकार दिला आणि मनसेच्या माध्यमातून सर्वात मोठी दहीहंडी मोठ्या आनंदाने साजरी केली. ह्या दहीहंडीसाठी स्वतःच्या अंगावर अविनाश जाधवांनी केसही घेतली. पण, ह्या माणसाने मराठी सणासाठी घेतलेला वसा मोठ्या उत्साहाने पुढे नेला..

अविनाश जाधवांना त्यांचं मत विचारलं तर ते म्हणता "माझा मराठी तरुण पब मध्ये जाऊन लाखो पैसे खर्च करून आनंद नाही घेऊ शकत. माझ्या लाखो मराठी तरुणाच्या एकतेसाठी आणि आनंदासाठी दहीहंडीची संस्कृती मी विकोपाला जाऊ देणार नाही. माझ्या मराठी माणसाच्या आनंदासाठी माझं जीवन समर्पित आहे. दहीहंडी सणासह सर्व मराठी सण अजून उत्साहाने साजरे होतील आणि मी त्यात अग्रभागी असेल..".

*ठाणेकरांनो, मग विचार काय करता..? आता, आपलं मत मराठी सणासाठी, मराठी संस्कृतीसाठी..आपलं मतं अविनाश जाधवांना..*

डॉ. प्रशांत शिरोडे.

ईडी झाली येडी...



ऑफिसमध्ये एका मित्राने विचारलं हे ईडी म्हणजे काय? सध्या खूप ऐकू येतंय.. त्याचा प्रश्न तसा साहजिकच होता. गेल्या एकदोन वर्षात हे ईडी म्हणजेच एन्फोर्समेंट डायरेक्टरेट म्हणजेच अंमलबजावणी संचालनालय खूपच कामाला लागलाय. जणू एवढं एकच सरकारी कार्यालय जे काम करतंय. काम करतंय किंवा त्यांच्याकडून काम करून घेतलं जातंय.

अंमलबजावणी संचालनालय पैश्यांची घेवाणदेवाण योग्य रीतीने झाली नसेल तर त्याची चौकशी करून "निरपक्षपणे" संबधीतानावर गुन्हा दाखल करत. देशस्थरावर कर्त्याकरवित्याच्या जोरावर कामाला लागलेले हे कार्यालय सामान्यांना माहित नव्हतं. अचानक निवडणुका आल्या कि हे चमत्कार व्हावा तसं हे कार्यालय काम करू लागत. सर्व सरकारी कार्यालय असंच काम करू लागले तर देशाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. प्रश्न येतो तो ह्या अगोदर अशी वेळ कधीच आली नसेल का? आली असेल पण ती राजकीय फायद्यासाठी तर नव्हती. आजच्या घडीला ईडी म्हणजे एक राजकीय बाहुला म्हंटल तरी चुकीचं ठरणार नाही.

देशस्थरावर चालेल ईडीच हे निपक्ष काम महाराष्ट्रात निवडणुकीच्या तोंडावर जोराने चालू आहे. विशेष म्हणजे जुन्या कुठल्यातरी गोष्टी ईडीला चौकशीसाठी आता म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर आठवतायत. अलीकडेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे चौकशीसाठी जावून आले. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात राजकीय भूकंप केल्यानंतर विधानसभेत काळजी घेण्यासाठी ईडीने हि कारवाही केली असेल, शेवटी निपक्षपात.. गेल्या दोन दिवसापूर्वी शिखर बँक घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारांवर गुन्हा दाखल केला.. थोडं अचंबित होण्यासारखं होत, कारण त्यांचं कि शरद पवार ह्या बँकेवर कधी सदस्यच नव्हते. मग पवारांनीच ठरवलं जावून येवू ईडीच्या कार्यालयात तर इडीनेच थोडं विचार करून सांगितलं तुमची चौकशीची गरज नाही..

शरद पवार वयाच्या ८०व्या वर्षी महाराष्ट्र दौऱयावर निघाले आणि ईडीला चमत्कार झाला आणि घाईघाईत गुन्हा दाखल केला. जेव्हा हे अंगाशी आलं तेव्हा ईडीने आपला निर्णय थोडा सबुरीने घेतला. ईडी नक्की आपली स्वायत्त, निरपेक्ष आणि सरकारी असलेलं काम विसरली असं वाटू लागलं. कोणीतरी इशारा द्यावा आणि दावणीला बांधलेला जनावरासारख ईडीने पळत सुटाव हे तितकं योग्य नाही.

अंमलबजावणी संचालयानाने नावाप्रमाणे निरपक्षपने कामाची अंमलबजावणी केली तर सामन्यांना ईडी झाली येडी...? हा प्रश्न पडणार नाही..

डॉ. प्रशांत शिरोडे.

कोकणोत्सव गणरायाचा...



आनंदाचा, चैतन्याचा, मांगल्याचा आणि उत्साहाच्या मंतरलेल्या दिवसातला शेवटचा दिवस म्हणजे "अनंत चतुर्दशी".. दहा दिवस परमेश्वर कुठलीतरी जादूच करून जातो.. महाराष्ट्राच्या भूमीवर तर स्वर्गाचं वात्सल्य दरवळत. काय जादू आहे ना ह्या सणात..! जणू परमेश्वर वर्षातील दहा दिवस भूतलावर विशेष रूपात येवून भूतलावावर आनंदाचं खिरापत वाटून जातो. जाणऱ्यावर्षी पुढच्या वर्षी लवकर येण्याची आस लावून जातो आणि येणाऱ्या वर्षी त्या दिवसाची ओढ लावून ठेवतो. हा काहीतरी भावनिक खेळ आहे आणि ती मनाची एक वेगळीच श्रद्धा आहे.. अरे हो मी गणेशोत्सवाबद्दलच बोलतोय..

आज अनंत चतुर्दशी .. दहा दिवस उत्साहाचं रोमांकित झालेलं वातावरण आज बाप्पाला थोड्या दिवसांसाठी दूर घेऊन जाणार झालय.. किती छान असतात ना गणेशउत्सवातले दिवस.. गणपती बाप्पा येणार म्हणून ती तयारीची लगबग.. बाप्पासाठी कुठलं मखर, बाप्पासाठी कुठला प्रसाद, बाप्पासाठी कुठला देखावा, बाप्पाच्या दर्शनासाठी प्रेमाच्या लोकांना आमंत्रण ह्या सगळ्याची तयारी काही वेगळीच असते. बाप्पाची आरती, बाप्पाचे रूप, बाप्पाचा प्रसाद आणि सभोतालच बदलेल वातावरण सगळं काही अलबेलच असत.. दहा दिवस वातावरणात झालेला बदल मानवी मनाला भावून जातो, कदाचित हि परमेश्वराची लिलयाच म्हणावी..

गणेशोत्सव म्हंटलं तर कोकणात त्याच विशेष महत्व आहे.. दिवाळीपेक्षा मोठ्या उत्साहाने आणि आत्मीयतेने गणेशोत्सव साजरा केला जातो. बाप्पाच्या प्रसादात दिवाळीसारखा फराळ बनवला जातो. साधारणतः कोकणात चार -पाच खोलीचं घर असत. बाप्पाला दोन्ही हातात धरून घरात आणलं जात आणि सर्वात पुढच्या खोलीत पाटावर ठेवून पूजा केली जाते. नंतर बाप्पाला पूर्ण घर, जनावरांचा गोठा, शेती आणि घराचा परिसर दाखवून, गेल्या वर्षी जी आमची प्रगती झाली ती तुझ्याच कृपादृष्टीमुळे झाली असं बाप्पाला सांगितलं जात. त्यानंतर बाप्पाची आरास जिथे असते तिथे बाप्पाला ठेवलं जात आणि प्राणप्रतिष्ठा केली जाते. रोज सकाळी आणि संध्याकाळी मनोभावे आरती केली जाते. ह्या काळात बाप्पाची भजन गायली जातात. एकमेकांच्या घरी बाप्पाच्या  दर्शनाला बोलवलं जात. शेवटच्या दिवशी बाप्पाची पूजा झाल्यानंतर गावातील गणपती एका घरानंतर दुसरं घर असे शिस्तबद्ध पारंपरिक वाद्यात परतीच्या वाटेवर निघतात..

घरी येताना हातावर आणलेल्या बाप्पाला निरोप देण्यासाठी डोक्यावरूनच घेऊन जातात, कारण त्याची प्राणप्रतिष्ठा झालेली असते आणि त्याच्या दैवीरूपामुळे तो भारदस्त झालेला असतो आणि तो माणसाच्या हातांना न पेलवणारा झालेला असतो. बाप्पा ज्या मार्गातून घरी आला त्या मार्गापेक्षा निरोपाचा मार्ग वेगळा असतो, कारण बाप्पाचं घरातलं वास्तव्य ह्या दहा दिवसारखं कायम रहावं हि त्यामागची भावना असते. सर्व गावातले बाप्पा पाटावर नदीकिनारी ठेवले जातात आणि गावासमोर बाप्पाला गार्हाणे मांडलं जातात. बाप्पाला गाऱ्हाण्यातून साऱ्या गावासमोर इच्छा व्यक्त केली जाते. हे साकडं साऱ्या गावासमोर मांडलं जात कारण त्या अडचणींसाठी किंवा इच्छेसाठी गावातूनच कोणीही धावून येत. गाऱ्हाणं हे एकांतात किंवा कुटुंबासमोर मांडलं तर त्याला महत्व नसत. नदीतीरावर बाप्पाची मनोभावे पुजा, आरती करून पाच वेळेस पाण्यात बुडवून बाप्पाला विसर्जित केलं जात. विसर्जनानंतर पाटावर नदीची वाळू आणली जाते आणि त्या पाटाची घरी आल्यावरही आरती केली जाते. पाटावरची वाळू घरात, शेतात आणि आजूबाजूच्या परिसरात टाकली जाते, ज्यातून बाप्पाचा सहवास दरवळत राहील अशी भावना असते.

निरोपाच्या दिवशी जड अंतःकरणाने बाप्पाला निरोप देताना डोळ्यातील अश्रुनी "गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या" ह्या भावनिक विनवणीने मनाची समजूत काढली जाते.. सजवलेले मखर बाप्पाच्या जाण्याने आज सुने होतील, बाप्पाच्या जाण्याने आज डोळे पाणवतील... बाप्पा सर्वाना सुखी ठेवो हीच प्रार्थना.. "निरोप घेतो आता आम्हा आज्ञा असावी, चुकले अमुचे काही त्याची क्षमा असावी"...

डॉ . प्रशांत शिरोडे..

इसरोचा योद्धा ..



चांद्रयान २ ची चर्चा जणू देशातील कान्याकोपऱ्यात घुमतेय .. गेले ५५ दिवस हि मोहीम चालू झाल्यापासून तर चांद्रयान चंद्रावर पोहोचण्याच्या दिवसाच्या रात्री २ वाजेपर्यंत ह्या मोहिमेला जितकं चर्चिल गेलं नाही तितकं ह्या दोन दिवसात ते चर्चेत राहील. ना कुठली मॅच होती ना कुठला विशेष कार्यक्रम होता पण सारा देश चांद्रयान २ ह्या मोहिमेच्या अखेरच्या टप्याकडे मन लावून टेलिव्हिजन समोर बसला होता.

रात्री १.५२ मिनिटांनी चांद्रयान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याचा अंदाज असताना सर्व ठरल्याप्रमाणे घडत होत. इसरोच्या प्रेक्षपण गृहात लाल रेषेवरून हिरवी रेषा त्या मोहिमेचं गणित स्पष्ट करत होती. चांद्रयान कमी वेगात व्यवस्थितरीत्या चांदोमामाच्या कुशीत उतरावं हे ह्या मागचा उद्देश असताना, सर्व तसंच घडतही होत आणि शास्रज्ञ टाळ्या वाजवून आपला आनंद व्यक्त करत होते. अवघ्या २.१ किलोमीटर अंतरावर असताना चांद्रयानाचा संपर्क इस्रोच्या कक्षागृहापासून सुटला आणि सगळीकडे स्मशान शांतता पसरली. शास्रज्ञ ह्या थोड्या चुकलेल्या क्षणाला जणू जिवंत करण्याचा प्रयत्न करत होती आणि रात्रभर प्रयत्न करताना आशेची किनार यशाची वाट शोधत होती. हे प्रयत्न १२ वर्षाच्या अथक कष्टाची परीक्षा होती..

चांद्रयान मोहिमेचं नेतृत्व करताना ह्या मोहिमेचं सर्व माहिती आणि प्रसारण हाताळणाऱ्या एम. विनिता शेवटच्या क्षणापर्यंत माहिती देत होत्या. चांद्रयानाशी संपर्क तुटल्यानंतर त्या भावुक झाल्या आणि काय बोलावं ह्या विचारात शांत झाल्या. अशा वेळेस देशासह जगाला आणि समोर बसलेल्या प्रतप्रधानांना माहिती देण्यासाठी स्वतः इसरो प्रमुख म्हणून पुढे येऊन मोहिमेच्या स्थितीची जबाबदारी घेतली.

सकाळी देशाला ह्या विशेष प्रयत्नावर प्रतंप्रधानांनी संबोधल्यानंतर, प्रतंप्रधान इसरोच्या कार्यालयातून बाहेर पडताना एक भावनिक क्षण घडला. इसरोचे मुख्य डॉ. के. शिवन प्रंतप्रधानांना निरोप देताना भावुक होऊन ह्या मोहिमेचा प्रमुख म्हणून जबाबदारी घेताना प्रतंप्रधानाच्या खांद्यावर भावनेच्या भरात रडू लागले. जगाच्या पाठीवर पहिल्यांदा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर मोहीम हाताशी घेणारा हा भावनिक झालेला योद्धा म्हणजेच डॉ. के. शिवन. ह्या भावनिक क्षणानंतर जगाला माहित झालेला अतिशय साध राहणीमान असलेला अवलिया म्हणजे डॉ. के. शिवन.

तामिळनाडूच्या खेड्या गावात गरीब शेतकऱ्याच्या घरात जन्मेलाला साधारण मुलगा. आठवी पर्यंत गावात शिक्षण घेतल्यानंतर पुढील शिक्षणासाठी पैसा नसताना आंबे विकून बारावी पर्यंत शिकून नंतर बी. एस्सी. केलं. गणितात १०० पैकी १०० गुण मिळवून शिष्यवृत्ती मिळवून इंजिनेरींग करून पुढे अंतराळ क्षेत्रात पदवीत्तर अभ्यास करून आय. आय. टी. मुंबई येथून पीएचडी केली. पदवीच्या अभ्यासक्रमापर्यंत गरिबीमुळे पायात चप्पल न घातलेला हा सामान्य मनुष्य अंतराळक्षेत्रात अनेक दैदिप्यमान रचू लागला आणि त्या जोरावर इसरो ह्या भारतीय अंतराळ संस्थेचा मुख्य पदावर पोहचला. आपल्या कारकिर्दीत चांद्रयान सारख्या मोहिमेला पहिल्याच प्रयत्नात यशाच्याजवळ नेणाऱ्या ह्या योध्याचा भारत भूमीला नक्कीच गर्व आहे. भारत मातेच्या ह्या पुत्राच चांदोमामाच्या कुशीतल्या कुतूहलतेच स्वप्न प्रत्यक्षात घडो ह्याच मनोभावे शुभेच्छा ..

डॉ. प्रशांत शिरोडे.

प्रवास चांद्रयानाचा ..


आज मध्यरात्री सुमारे २ वाजेच्या दरम्यान चांद्रयान २ चांदोमामाच्या दुनियेत पोहचणार होत. ५५ दिवसाच्या यशस्वी प्रवासानंतर व्यवस्थितरीत्या चांद्रयान चंद्रावर पोहचण्याचा प्रवास करत होता. भारतीय अंतराळ केंद्र म्हणजे इसरो च्या बंगळुरू केंद्रातून सर्व शास्रज्ञ, प्रतप्रधान आणि सर्व अंतराळ प्रेमी ठरल्या वेळाप्रमाणे चांद्रयानावर आपला डोळा लावून बसले होते.

रात्रीचा तो क्षण काही वेगळाच होता, जस चांद्रयान चंद्राच्या जवळ जवळ जात होत तसं शास्त्रज्ञाचा आनंद वाढत होता. अगदी २.१ किलोमीटर वर चांद्रयान येईपर्यंत सगळं अलबेल होत आणि अचानक चांद्रयानाशी अंतराळ केंद्राचा संपर्क तुटला. सगळी कडे काही क्षणापुर्वी असलेलं आनंदाचं वातावरण चिंतेत बदललं. होत्याच नव्हतं झालं.. साऱ्या जगाचं लक्ष लागलेली मोहीम अचानक स्तब्ध झाली. रात्रभर जागून प्रयत्नांची पराकाष्टा करत चांद्रयानावर माहिती मिळवण्यासाठी प्रयत्न चालू होता आणि तो अजूनही चालू आहे.

जागतिक स्थरावर चंद्रावर अशी मोहीम करणारा भारत हा अमेरिका, रशिया आणि चीन नंतर चौथा देश होता. सर्वात कमी खर्चात हि मोहीम हाती घेण्यात आली होती. दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत पहिला देश ठरणार होता. गेल्या १० वर्षांपासून हि मोहीम हाती घेण्यात आली होती..

चांद्रयान २ हि मोहीम तशी खूप रहस्यमय होती. चांद्रयान अवघ्या २.१ किलोमीटरवर चंद्राच्या पृष्ठभागावर पोहचण्यापासून संपर्कातून तुटला.. जणू काल्पनिक गोष्टीसारख्या चांदोमामाच्या कुशीत तो माहिती देण्याचं विसरला...असो.. प्रतप्रधानांनी शास्त्रज्ञांचं मनोबल वाढवून संबोधीत करताना "प्रयोग हा प्रयोग असतो अपयश नसतो..". प्रतप्रधान इसरो केंद्र सोडत असताना इसरो प्रमुख डॉ. के. शिवन प्रंतप्रधानांच्या गळ्यात पडून आपले आसू अनावर करू शकले नाही...सगळं भावनिक वातावरण झाल होत. असो.. तरीहि हि मोहीम इसरो ह्या भारतीय अंतराळ संस्थेला एक विशेष स्थरावर घेऊन गेली. सर्व शास्त्रज्ञांचं अभिनंदन आणि भावी वाटचालीस भारतीयांच्या शुभेच्छा...

डॉ. प्रशांत शिरोडे..

गर्व से कहो..

प्रभु श्रीराम काल अनेक वर्षाच्या वनवासानंतर जन्मस्थळावर मोठ्या सम्मानाने विराजमान झाले.. हया दिवसाच खर श्रेय जात ते हिंदूहृदयसम्राट बाळासाहे...